Wednesday, July 29, 2020

बालपण १


नमस्कार,
            सगळे कसे आहात? ठीक आहात ना? मी तर छान आहे पण मला माफ करा कारण मी खूप दिवसानंतर पुढील भाग लिहीत आहे कारण मी नंतर सांगणार चला तर आपण पुढे काय झालं ते बघूया?
           मी आणि माझी बहीण मोनिका आम्ही लहानपणापासून आजीकडे राहिलो कारण परिस्थिती तशी होती. तेव्हा आम्हाला काही कळायचं पण नाही. या वयात सगळ्यांना आईवडिलांची खूप जरुरत असते. आम्हाला परिस्थिती समोर घुटन टेकाव लागलं. तेव्हाच मी एक किस्सा सांगते माझी बहीण लहान असताना दिवसभर खेळायची, मुलं म्हणजे खेळणारच त्यामुळे रात्री झोपेतून उठून रडायची आणि म्हणायची माझं माझे पाय दुखत आहेत माझे पाय दाबून दे तेव्हा मी पण लहान होते तर मग मी पण तिला रागवायची मी नाही पाय दाबणार असं तसं पण शेवटी मला तिला सांभाळून घ्यायचं होतं म्हणून मी तिचे पाय दाबायची तेव्हा कसंतरी वाटायचं कारण आई-बाबा पासून दूर होतो रडू यायचं पण शेवटी स्वतःला सांभाळून घ्यायचो.
         माझ्या मैत्रिणी दररोज घरी गेल्यावर सगळ्या गोष्टी त्यांच्या आई-बाबांना सांगायच्या. पण आम्ही घरी शनिवारी दुपारी जायचो आणि रविवारी रात्री यायचो जसं मुली लग्नानंतर माहेरी येतात तेव्हा त्यांची मनाची हालचाल काय असते ते आम्ही लहानपणापासूनच अनुभवलो.काही लोक आम्हाला चिडवायचे माहेरी जाऊन आलात का? तेव्हा आठवडा बराच्या सगळ्या गोष्टी आई बाबांसोबत बोलायचं.आजीकडे सगळ्या काही सुविधा होत्या पण आई बाबा नव्हते कधीकधी मन भरून यायचं सणाच्या दिवशी आई आजीकडे यायची तेव्हा मी आणि बहीण खूप आनंदी व्हायचो आणि तिला नेहमी आणखीन दोन दिवस जास्त राहावे म्हणून जिद्द करायचो.                शेवटी  एकच सांगू इच्छिते परिस्थिती कितीही वाईट असली तरी मुलांना आपल्यापासून दूर ठेवू नका ही माझी मनापासून सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद!
                 

Tuesday, June 23, 2020

बालपण

नमस्कार मंडळी, सगळेजण घरात सुखरूप आहात अशी मी आशा करत आहे, कारण सध्याची परिस्थिती खूपच भयानक आहे.stay home stay safe☺️
आजच्या भागात आपण नीताच बालपण कसं होतं ते बघूया चला तर मग उशीर काय करताय?
नीताच बालपण छान सुरू होतं, किती सुंदर असतं ना कशाची चिंता, ना कशाची काळजी फक्त इकडे तिकडे बाळगणे,खेळणे आणि 🏠 येऊन आई आई करणे.. वर्गात हुशार मुलगी होती, मग इथून तिच्या जीवनाचा खडतर प्रवास सुरू झाला, अचानक वर्ग तिसरीत असताना तिच्या डोक्यात जखम झाली, अगोदर ते छोटंसं होतं,केस गळत होते.मग दवाखान्यात दाखवले तर गोळ्या दिलेत.पण जखम काही कमी होत नव्हतं उलट ते वाढत गेला.ते जखम इतकं दुखायच हळूहळू तिचं बाहेर खेळण बंद झालं, कोणाशी बोलत नव्हती, खूप रडायची अक्षरशः वेदनेमुळे तिला रात्री झोप पण येत नव्हतं.मग तिचे वडील झोपाळा बांधून तिला त्यात झोपवायच प्रयत्न करायचे.पण या सगळ्या वेदनेत तिचे आई-वडील तिच्या सोबत खंबीरपणे उभे होते.वडील दररोज ‌मलम‌‌पट्टीसाठी दवाखान्यात घेऊन जायचे, मलमपट्टी करताना अक्षरशः त्यांना चक्कर यायचं.ते दोघेपण आतून एकदम खचून गेले होते पण चेहर्यावर कधी दाखवले नाहीत. 
देव म्हणजे आई-वडील.वडील सोलापूरातील सगळ्या दवाखान्यात दाखवलेत आणि आई सगळ्या मंदिरात जाऊन प्रार्थना करायची.पण बाकीच्या मुलींसारख ती वेण्या घालू शकत नव्हती.नेहमी ती डोक्याला कापड बांधायची जेणेकरून ते जखम कोणाला दिसू नये.खूप प्रयत्नानंतर तिचा जखम ब-यापैकी कमी झाला.देवाकडे एकच प्रार्थना करते, अशी परिस्थिती कोणाला देऊ नये आणि मला यातून बाहेर  काढल्याबददल धन्यवाद !! ,🙏🙏
"काही वादळ विचलित 
करण्यासाठी नव्हे तर  
वाट मोकळी करण्यासाठी
येत असतात"

Thursday, June 18, 2020

नीताचा प्रवास

नमस्कार !
नीताच्या पोस्टमध्ये सगळ्यांच स्वागत आहे.
पहिल्यांदा लेख लिहीत आहे,त्यामुळे खुप भीती वाटत आहे पण विचार केला किती दिवस मी घाबरणार?

खुप दिवसापासून विचार करत होते मी कोण आहे ?काय करत आहे?सगळे काही ना काही करत आहेत .
कोणी डान्स,कोणी कूकिंग,कोणी गाणी गात आहेत. त्यांना बघून मी खुप खचुन जायची.आज मी ठरवले कि माजी कहाणी लिहिणार नीता पासून नीतूचा प्रवास ........ मग अगोदर आपण नीता कोण आहे जाणून घेऊयात का?

नीताचा जन्म सोलापुरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.सोलापूरवर  श्री सिद्धेश्वर महाराजांची असीम कृपा आहे. नीताचे वडील तेलंगणातले पण ते सोलापुरात स्थायिक झालेत. कुटुंबात एकूण ५ जण बाबा,आई,दादा, बहीण आणि मी,छोटस कुटुंब.घराची परिस्थिती सर्वसामान्य होती.बाबा कामाला जायचे आणि आई घरांत छोटे-मोठे काम करायची.सगळ काही सुरळीत होत.मग आम्ही शाळेत जाऊ लागलो.आमचं घर थोडं शहराबाहेर होत, त्यामुळे आम्हाला कोणत्याही कामासाठी, शाळेसाठी शहरात यावे लागे.ही गोष्ट आहे 2000 पूर्वीची.
बालपणीच्या आठवणी:-
सगळ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे बालपण! त्यातील काही क्षण आपले जीवनच बदलून टाकतात.नीताच्या बालपणाच्या रस्त्यात खूप काही दगडधोंडे होते.दररोज शाळेत सायकलवर बाबा सोडायचे.ती वर्गात हुशार होती.इयत्ता तीसरी पर्यंत सगळं काही ठीक होतं.यानंतर तीचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं.यानंतरच प्रवास तीच्यासाठी खूप खूप कठीण होतं.
पुढच्या भागात नीताच्या आयुष्यात काय झालं ते बघता.
धन्यवाद..............